शेतीमाल लिलावाच्या पद्धती--
आजमितीस महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विश्वासपात्र अशा बाजारपेठ असून त्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत फादेशीर व उत्कृष्ट कामकाज करीत आहेत. स्पर्धात्मक युग असल्याने खरेदीदार बाजार आवारांवर येऊन खुल्या पद्धतीने लिलावात भाग घेऊन मोठ्या प्रमाणावर शेतीमाल खरेदी करून व्यापार करीत आहेत. शेतीमाल खरेदी- विक्रीची प्रक्रिया हि शेतकऱ्यांच्या समोर कोणतीही फसवणूक य करता उघड लिलाव पद्धतीने स्पर्धायुक्त बोली बोलून उच्च बाजारभावाने शेतीमाल खरेदी केला जातो. बाजार समित्या शेतकरी हिताच्या असल्याने बाजार आवारावर शेतीमाल विक्रीस आलेनंतर शेतकऱ्यांना आवश्यक अशा सर्व सुविधा बाजार समितीमार्फत पुरविल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी आपला शेतीमाल विक्री करणेसाठी बाजार समित्यांना प्रथम पसंती देत असतो.
कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि.नाशिक चे मुख्य व उपबाजार आवारांवर कांदा, टोमॅटो, धान्य, भाजीपाला, जनावरे, बेदाणा, द्राक्षमणी या शेतीमालाचे लिलाव उघड पद्धतीने होत असतात. बाजार आवारावर कितीही शेतीमालाची आवक असली तरी शेजारी आपला शेतीमाल विक्रीसाठी आलेनंतर नंबर प्रमाणे त्यांच्या शेतीमालाचा लिलाव केला जातो त्यास आवारावर मुक्कामी थांबावे लागत नाही. बाजार समितीत शेतीमालाला योग्य बाजारभाव व शेतीमाल विक्री झालेनंतर २४ तासाच्या आत तात्काळ रोख पेमेंट दिले जाते. बाजार समितीने मुख्य व दुय्यम बाजार आवारावर शेतकरी, व्यापारी, आडते , कामगार यांचेसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शेतीमाल लिलावाच्या सुटसुटीत उघड लिलाव पद्धतीमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरील शेतीमाल पिंपळगांव बसवंत चे बाजार आवारावर विक्रीसाठी येत असून दररोज ५०० ते ६०० ट्रॅक्टर व ६०० ते ७०० जीपमधून साधारणतः २० ते २५ हजार क्विंटल कांदा दैनंदिन विक्रीस येतो व टोमॅटो हा शेतीमाल ३ ते ४ हजार वाहनांमधून २० किलो भरतीचे २.५० ते ३ लाख क्रेटस दररोज विक्रीसाठी हंगामामध्ये मुख्य बाजार आवारावर येत असतात.
बाजार समितीचे कामकाज-
पिंपळगांव बसवंत बाजार समितीत कांदा, टोमॅटो व इतर शेतीमाल शेतकऱ्यांचा विक्री झालेनंतर नियमाप्रमाणे २४ तासाच्या आत रोख पेमेंट अदा केले जाते. परंतु येथील व्यापारी तात्काळ विक्री झाल्यानंतर लगेचच पेमेंट देतात हि बाब अतिशय महत्वाची आहे. आजपावेतो बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्री झालेनंतर कोणत्याही शेतकऱ्यांची पेमेंट बाबत फसवणूक झालेली नाही. खरेदीदाराकडून शेतकऱ्यांचे पैसे बुडविले जात नाही ही अभिमानाची गोष्ट आहे.
बाजार समितीचे मूळ उत्पन्न कांदा व टोमॅटो या प्रमुख शेतीमालावर अवलंबून आहे. बाजार आवारावर येत असतात. सादर व्यापाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे रहिवासी पुरावे, ओळखपत्र अथवा त्त्यांचेकडे कोणती मालमत्ता आहे याचा काहीही एक पुरावा नसतो. सदरचे व्यापारी टोमॅटो हा नाशवंत माळ स्थानिक आडते यांचे मार्फत खरेदी करत असतात. सर्व शेतकरी बांधवांचे शेतीमालाचे पैसे देणेची जबाबदारी ही आडत्यांवर असते. संपूर्ण हंगामामध्ये अंदाजे १००० कोटी पर्यंत उलाढाल होते. संपूर्ण हंगामात व आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांच्या टोमॅटो व कांदा या मालाचे एक रुपयासुद्धा बुडत नाही व बुडलेला नाही व अपवादात्मक परिस्थितीमध्ये पैसे राहिल्यास ते काढून देण्याची जबाबदारी बाजार समितीने पूर्ण केलेली आहे. पैसे बुडाल्याची कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार बाजार समितीकडे अथवा शासनाकडे नाही.
बाजार समिती अस्तित्वात नसल्यास-
बाजार समित्या अस्तित्वात नसल्यास खरेदीदार शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतीमाल खरेदी करतील व तेथे स्पर्धा नसल्याने चालू बाजार भावापेक्षा ४० ते ५० रुपये कमी दराने शेतीमाल खरेदी करणेचे व्यापाऱ्यांचे धोरण राहील व अनेक शेतकऱ्यांचे पेमेंट थकवून मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा झालेनंतर परप्रांतीय व्यापारी/ खरेदीदार शेतकऱ्यांना फसवून त्यांचे शेतीमाल विक्रीचे पेमेंट अदा न करता पळून जातील.
जसे द्राक्ष या शेतीमालाचे व्यवहार बाजार आवारावर होत नाही. परप्रांतीय व्यापारी परस्पर शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन हे व्यवहार शेतकरी/ व्यापारी दोघांचे मध्यस्थीने होतात. त्या व्यवहारामध्ये अनेक शेतकरी बांधवांचे पैसे बुडालेले आहे. त्या बाबतीत अनेक वर्तमान पत्रात व पोलीस स्टेशनमध्ये केसेस दाखल झालेल्या आहेत व त्या पैशाची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. त्यामुळे ते पैसे शासनाने किंवा कोणत्याही व्यक्तीने काढून दिलेले नसून बुडालेले आहे . याचे मुख्य कारण मध्यस्थी म्हणून कोणीही जबाबदार नाही म्हणून बाजार समितीचे नियंत्रण असणे अत्यंत महत्वाचे आहे.
तसेच सन १९९५ पासून पिंपळगांव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीची नवीन स्थापना होऊन प्रत्यक्ष कामकाज दि.१/१/१९९६ पासून सुरु झालेले असून आजमितीस कायमस्वरूपी व हंगामी कर्मचारी मिळून १०० ते १२५ कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य बाजार समितीत काम करणेत गेलेले आहे. कर्मचाऱ्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह बाजार समितीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. बाजार समित्या नसल्यास कर्मचाऱ्यांचा नोकरीचा व त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्व्हचा प्रश्न गंभीर होऊन कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची परिस्थिती येऊन उपासमारीची वेळ येणार आहे.
तसेच बाजार समितीच्या बाजार आवारात शेतीमालाचे वजनमाप व हमालीचे कामकाज करणेसाठी हजारो कामगार आहेत. बाजार आवारावर शेतीमालाची आवक असल्यास कामगारांना काम उपलब्ध होते व त्यानुसार त्यांना पैसे मिळतात. परंतु शेतीमाल बाजार आवारावर विक्रीस न आल्यास हजारो कामगारांचे कुटूंब बेरोजगार होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल.
हिशोब तपासणी -
आपल्या बाजार समितीची
१) सन २०१३-१४ या वर्षाची सरकारी हिशोब तपासणी श्री.एस.एन. पवार, विशेष लेखा परीक्षक सह. संस्था, वर्ग-१ सह. संस्था(फिरते पथक) नाशिक विभाग नाशिक.
२) सन २०१४ - १५ व २०१५ - १६ या वर्षाची सरकारी हिशोब तपासणी श्री. ए.के. पाटील, विशेष लेखा परीक्षक वर्ग - १ (अधिन विभागीय सह. निबंधक सह. संस्था) नाशिक विभाग नाशिक यांनी केलेली आहे.
३) सन २०१६ -१७ या आर्थिक वर्षाचे सरकारी हिशोब तपासणी संतोष एस. वाघचौरे विशेष लेखा परीक्षक वर्ग १ सहकारी संस्था (आ. वि म.) नाशिक.
४) सन २०१७-१८ ची सरकारी हिशोब तपासणी श्री डी. एन. काळे जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग १ सहकारी संस्था नाशिक यांनी पूर्ण केली आहे.
५) २०१८-१९ आर. सी. शाह पी. निबंधक सह संस्था लेख परीक्षण नाशिक विभाग
६) २०१९-२० आर. सी. शाह पी. निबंधक सह संस्था लेख परीक्षण नाशिक विभाग
७) २०२०-२१ आर. सी. शाह पी. निबंधक सह संस्था लेख परीक्षण नाशिक विभाग
८) २०२१-२२ सुरेश महंत विशेष लेखा परीक्षण वर्ग १ सहसंस्था (पठान) नाशिक विभाग
९) २०२२ -२३ जिल्हा विशेष लेखा परीक्षण वर्ग १ सहकारी संस्था नाशिक विभागविभाग
मुदत ठेव-
बाजार समितीने दरवर्षी शिल्लक राहिलेला वाढावा राष्ट्रीकृत बँकामध्ये दि ३१ मार्च २०२५ पावेतो रुपये ........
वाहने-
१) रुग्णांची सेवा करण्यासाठी रुग्णवाहिके मार्फत नाममात्र दरात जनसेवा करणारी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांव बसवंत ही एकमेव बाजार समिती आहे.
२) जनतेची सेवा करण्यासाठी वैकुंठरथ मोफत दरात उपलब्ध करणारी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांव बसवंत ही एकमेव बाजार समिती आहे.
३) शासनाचे आरोयग्यविषयक धोरण लक्षात घेऊन आवारामध्ये साचणाऱ्या खराब टोमॅटो व कांद्यापासून दुर्गंधी व पर्यायाने रोगराईचा फ़ैलाव होऊ नये म्हणून नाशवंत झालेला माल वाहतूक करून बाहेर टाकण्यासाठी पाच (५) ट्रॅक्टर खरेदी केलेले आहेत.
४) कार्यक्षेत्रातील वेळोवेळो निर्माण होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन बाजार समितीने स्वनिधीतून ५ पाण्याचे टँकर खरेदी केले आहे.
५) पिंपळगांव बसवंत कृषि उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी रक्कम रु.२३.८६ लक्ष खर्च करून नवीन जे.सी.बी. मशीन खरेदी केलेले आहे. अद्यापपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ये-जा करण्यासाठी शिवार रस्ते दोन्ही गावांच्या शेतकऱ्यांच्या हेवादाव्यापोटी प्रलंबित आहेत. काही शेतकऱ्यांना रस्त्यासाठी जागा आहे परंतु सदरचा रास्ता शासनाच्या विविध क्लीष्ट अटीमुळे मजबुतीकरण करता येत नाहीत. तसेच दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जलयुक्त शिवाराची कामे करण्यासाठी विविध गावातील नदीपात्रामध्ये बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी, बंधाऱ्यावर भराव टाकण्यासाठी शेतकऱ्यांना तासी सुमारे ७०० रुपये भाडे खर्च करून जे.सी.बी. घ्यावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या कष्टाचा पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यासाठी सध्याच्या असलेल्या दारात ५०% सवलतीचे दराने जे.सी.बी. मशीन शेतकरी बांधवांना देऊन मोठा दिलासा दिलेला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने दुष्काळाची स्थिती असो कि अति वृष्टी असो अशा कठीण परिस्थितीवर मत करून तयार केलेला उच्च प्रतीचा शेतीमाल नजीकच्या बाजार समितीत आहे त्या स्तिथीत, सुस्थितीत पोहच व्हावा. या दृष्टिकोनातून बाजार समितीचे सभापती मा.आ. दिलीपराव बनकर यांचे कल्पनेतून पिंपळगांव कृषी उत्पन्न बाजार समितीने नवीन जे.सी.बी. खरेदी केलेले आहे. जे.सी.बी. मशीन खरेदी करणारी नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव बाजार समिती आहे.
६ ) बाजार समितीचे सभापती यांना वेळोवेळी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात तसेच शासकीय कामानिमित्त मुंबई-पुणे येथे जावे लागते त्यासाठी बाजार समितीने टाटा सफारी ही गाडी खरेदी केलेली आहे.
अनुज्ञप्तीधारक-
ठरिवणे सोयीचे व्हावे, चांगल्या दर्जाचे शेतीमालाचे उत्पादन होण्यास उतेजन मिळावे हेतूने नियंत्रित बाजार क्षेत्र स्थापन
करणेत आलेले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत चे स्वमालकीची मुख्य व उपबाजार आवारांसह एकूण ५८ हेक्टर (१४५ एकर) एवढे मोठे क्षेत्र
असलेली नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील एकमेव बाजार समिती आहे
* नवीन 100 एकर मध्ये सुपरमार्केट पिंपळगाव बसवंत, क्षेत्र ४० हे.
* हायवे मार्केट (डाळिंब व बेदाणा विभाग), पिंपळगाव बसवंत, क्षेत्र ०४ हे. २०आर.
* भाजीपाला मार्केट (कांदा विभाग) , पिंपळगाव बसवंत, क्षेत्र ०२ हे. ६८ आर.
दुय्यम बाजार आवारे :-
* सायखेडा (कांदा विभाग) क्षेत्र ०५ हे. १० आर.
* ओझरमिंग (भाजीपाला विभाग) क्षेत्र ०२ हे. ६८ आर.
* पालखेड (धान्य व द्राक्षमणी विभाग) क्षेत्र ०१ हे. ७३ आर.
* क. सुकेणे क्षेत्र ०२ हे. ०० आर.
*औरंगपूर बेंडाळी ५ हेक्टर * तात्पुरते ख. वि. केंद्र.शिरवाडे वणी (द्राक्षमणी लिलाव) क्षेत्र ०.४० आर.